पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतिबनातून - विकलचंद्र

इमेज
विकलचंद्र गाण्यातला मी तानसेन नाही पण कानसेन नक्कीच आहे. याचे बरंच मोठे श्रेय माझ्या आईला आणि आकाशवाणीला आहे. नागपूर आकाशवाणी केंद्रावरून सकाळी प्रसारित होणारा अर्चना ह्या भक्तिसंगीताचा कार्यक्रमच माझी आई गेली कित्येक वर्ष नियमितपणे भक्तिभावानं ऐकत आहे.  पहाटे लवकर उठून कामांना सुरुवात करतांना चहाचं आधण ठेवणे आणि रेडिओच बटन दाबणे हे तिचे व्यसन आहे…….. हो व्यसनच म्हणावं लागेल. याचा परिणाम असा झाला की सकाळी अंथरुणातून बाहेर येताना कुमारजींचा  ' मलयगिरीचा चंदन गंधित धूप' लागलेला असायचा आणि सुमन ताईंची राधिका हरी भजनी रंगलेली असायची. पाठोपाठ माणिकताईं 'क्षणभर उघड नयन' आळवायच्या, आशाबाईंच्या 'प्रभाती सूर नभी रंगती' ' लता दिदींच 'तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता' काना मनावर बिंबवायच्या, आशालता वाबगावकरांच्या 'रविकिरणांची झारी' बाबूजींच्या 'देहाची तिजोरी' अश्या कित्येक गीतांच्या साथीने शाळेची तयारी होत असे.  जस जसे मोठे होत गेलो तसं तशी अशी समृद्ध सकाळ मात्र अभावानेच अनुभवता येऊ लागली. लहानपणीच झालेल्या या सूरसंस्कारां नंतरही,  गळ्य...

स्मृतीबनातून प्रासंगिक - साssथी रे....

इमेज
साssथी रे… हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित, काळजात कायम स्वरुपी घर करून राहतील अशा अनेक अजरामर शब्द - संगीत रचना, हिंदी चित्रपट सृष्टीने रसिकांना बहाल केल्या आहेत. शब्द, सुर, ताल यांचा सुंदरसा गोफ विणणाऱ्या या रचनांनी, जरी एखाद्या चित्रपटासाठी जन्म घेतला असला, तरी पुढे त्या स्वयंभू होऊन गेल्या. विनाशी देहातील अविनाशी आत्माच जणू. चित्रपट लक्षात राहो अथवा न राहो ही गीतं वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ऐकली जातात, आळवली जातात, स्मरली जातात आणि चिरंजीवी होतात. अनेक नव्या कलाकारांना ती अविष्कारित करण्यासाठी खुणावत राहतात.  या गीतांच्या श्रृंखलेत, 1977 साली प्रदर्शित झालेल्या  'कोतवाल साहेब' या चित्रपटातील, नायिका अपर्णा सेन आणि नायक शत्रुघ्न सिन्हा  यांच्या वर चित्रित झालेल्या गीताचा नक्कीच समावेश होतो. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात असलेल्या एकूण तीन गीतां पैकी, दोन आशा भोसले यांनी तर एक गीत हेमलता यांनी गायले आहे. मात्र संगीत निर्देशक रवींद्र जैन यांच्याच लेखणीतून उतरलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या 'साथी रे भूल न जा ना मेरा प्यार' या गीताचं गारूड ...

प्रासंगिक-आत्म षटकम्

इमेज
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता  खरंतर प्रस्तुत लेखाचा विषय हा माझा, अधिकार प्रांत तर नाहीच, अनुभव प्रांतही नाही. एक दिवस, अलीकडे फारच लोकप्रिय झालेल्या 'व्हाट्सअप' विद्यापिठात सकाळी सकाळी प्रवेशता झालो आणि एक निरतिशय सुंदर स्तोत्र ऐकायला मिळालं. आशय घनता आणि सुरेख अर्थवाही भावपूर्ण गायन यामुळे स्तोत्र मनात खोलवर कुठेतरी रुजून गेलं. साहजिकच त्यादिवशी आणि अजूनही, अनेकदा त्याची पारायणे होतात.  प्रथमच स्तोत्र ऐकते वेळी लक्षात आलेला वरवरचा अर्थ, पुनःपुन्हा ऐकल्याने हळूहळू अधिक उलगडत गेला. लक्षात आलं की आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्यांची उत्तरे यात दडली आहेत. या तत्वज्ञानाचा संपूर्ण अंगीकार वगैरे जमला नाही, मात्र अंशभर जरी घेता आलं, तरीही जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल आणण्याची ताकद यात आहे. मनात आल की पुरातन ग्रंथांमध्ये असलेला ज्ञानाचा हा अमूल्य ठेवा, ग्रंथांकडे दुर्लक्षच केल्यामुळे म्हणा किंवा ते काहीतरी जड, कठीण असल्याची भावना करून घेतल्याने म्हणा सर्व जनांच्या कक्षेत सर्व साधारणपणे येत नाही. पण कधी कधी  एखादा विचार सहज, सुलभ,रसपूर्णपणे ...