स्मृतीबनातून – भरती(गीतांजली पद्य ९)
ही कविता सांगते की, ईश्वर हा केवळ मंदिरात नसून तो निसर्गाच्या कणाकणात आणि मानवाच्या आनंदाच्या लहरींमध्ये व्यापलेला आहे. जेव्हा माणूस सृष्टीच्या या अथांग सौंदर्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याला खऱ्या आनंदाची आणि ईश्वराची प्राप्ती होते. आनंदेरई सागर थेके एसेछे आज बान दाओ गो सभाय छेड़े दाओ गो, भरे निओ गान। आलोक-छायार महामेलाय, आमिओ जे एक कोना, धूलि-कनार माझे आमार आपनके जे जाना। एइ जे आकाश, एइ जे बातास, एइ जे आलोक-धारा सकल सुखेर माझे आमि हयेछि आत्महारा। जेइ दिके तेइ ताहार पावा, जाहार शेष नेइ कभु, आपनार माझपाने ताहारेई खुँजे पावा प्रभु। भरती आनंदेरई सागर थेके (९) आनंद सागरास आज भरती आली वल्हवा जीवन नौका तुम्ही दृढ राहुनी घ्या लादून नौकेत ती दुःखे सारी निर्धार पार जाण्याचा पातला मृत्यू जरी आनंद सागरास आज अशी भरती आली कोण रे तो मागुती फिरण्यास सांगतो कोण रे तो अशी मनाई करतो उत्सव काळी कोण भयाचे स्मरण करतो भय तुमचे ते आम्ही सर्व जाणतो कुठली ग्रहपीडा अन् कुठला शाप तो? सुखे किनारी का बसून राहण्यास सांगतो? धाडसाने धरा रे शिडाच्या दोऱ्या सर्व गाऊ या मिळून सुरेल गीत पर्व आनंद सागरास आज अशी भरती आली नि...