स्मृतीबनातून –सजण दारी उभा
सजण दारी उभा लवचिकता हा भाषेचा स्वभावधर्म आहे. जशी वळवावी तशी ती वळत जाते. एकाच शब्दाला अर्थाच्या कितीतरी छटा असू शकतात. भाषेची ही श्रीमंती मानली जाते. मराठी भाषेतही विभिन्न अर्थछटा असलेले कितीतरी शब्द आहे जसे जीवन, तीर, मान, पाठ, वर, नाव, काळ अशी मोठी यादी देता येईल. जी गोष्ट शब्दांना लागू तीच वाक्याला, लेखाला, कवितेला ही लागू होते. त्यामुळेच एकच साहित्यकृती निरनिराळ्या वाचकांना निरनिराळी भासू शकते. त्यांना निरनिराळा अर्थबोध होऊ शकतो. जो जशी व्याख्या करेल, अर्थ काढेल त्याप्रमाणे तो बदलतो. मराठी काव्याचा प्रांत तर या वैशिष्ट्याने समृद्ध आहे. मराठीत अशी कितीतरी गाणी, कविता, रचना आहेत की त्यांचा वरवरचा अर्थ एक, तर सखोल अर्थ अगदीच निराळा असतो. काहीवेळा वरकरणी शृंगारिक, लौकिक वाटणाऱ्या एखाद्या कवितेच्या गर्भात गहन, गूढ, रहस्यमयी, अलौकिक अर्थ जोपासलेला असू शकतो. किंवा जुळ्या भावंडांप्रमाणे दोन्ही अर्थ अगदी सुखनैव नांदू शकतात. अनेकदा तर पुनःपुन्हा ऐकताना अर्थाचा नवा पदर उलगडून येतो. सकृतदर्शनी प्रियकर–प्रेयसी, विरह भावना, मीलनाची ओढ अशा शृंगार प्रांतात घेऊन जाणारी सुरेश भटांची एक...