स्मृतिबनातून - विकलचंद्र
गाण्यातला मी तानसेन नाही पण कानसेन नक्कीच आहे. याचे बरंच मोठे श्रेय माझ्या आईला आणि आकाशवाणीला आहे. नागपूर आकाशवाणी केंद्रावरून सकाळी प्रसारित होणारा अर्चना ह्या भक्तिसंगीताचा कार्यक्रमच माझी आई गेली कित्येक वर्ष नियमितपणे भक्तिभावानं ऐकत आहे.
शाळेच्या त्याच दिवसांत, नागपूरमध्ये आजोळ शहरातच असल्याने सुट्टी लागताच माझा मुक्काम तिकडेच हलायचा. आजोळचा वाडा प्रशस्त होता. समोरा समोर तीन मजली दोन इमारती होत्या. आमच्या समोरच्या इमारतीत आजोबांचे मामा राहत. तेच वाड्याचे मालक. त्यांच्या कडे त्याकाळी चावीचा ग्रामोफोन होता. मला त्याचे आकर्षण तर होतेच पण अधिक आकर्षण होते ते त्याच्या त्या सोनेरी भोंग्यातून निघणाऱ्या आसमंत भारून टाकणाऱ्या सूरावटिचे. त्यावेळी शब्दार्थ जाणण्याची समज पूर्णतः आली नव्हती.
१९६५ च्या सुमारास आलेली आणि आजतागायत तजेला तसच लोकप्रियता जराही कमी न झालेली, आणि मी पहिल्यांदाच ऐकत असलेली दोन गीतं माझ्या मनात खोलवर घर करून गेली. मोजकेच पण वेधक शब्द, निव्वळ हार्मोनियम आणि तबल्याची साथ, द्रुत ठेका, मोहक चाल आणि चित्ताकर्षक लयकारीत निरतिशय सुरेल अदाकारी ही त्या दोन्ही गीतांची मर्मस्थानं होती.
नृसिंह जन्मोत्सवासाठी राजापूरात केळवली इथे गेलो असताना दुसऱ्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. केशर मिसळलेल्या दुधाच्या रंगा सारखा चंद्र (१८/५/२०१९) पाहून अचानक लहानपणीच मनात आणि कानांत घर करून बसलेल्या गीतांच्या आठवणी उजळून निघाल्या. माझ्या आठवणीप्रमाणे ७८ आर पी एम च्या ग्रामोफोन तबकडीच्या एका बाजूला असलेलं 'उगवला चंद्र पुनवेचा' आणि दुसऱ्या बाजूला 'विकल मन आज' ही ती अप्रतिम नाट्यगीतं.
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
उगवला चंद्र पुनवेचा(गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा)
किती शुद्ध, सात्विक, सकस शृंगारिक रचना. बजारु पणाचा लवलेशही नाही. प्रणयरस वितळला आहे, मात्र तो ही या मर्त्यलोकीचा नसून स्वर्गलोकीचा आहे. शतप्रतिशत खानदानी कल्पना. आचार्यांच्या कलासक्तीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. या गीता इतकाच गीतकारही लोकप्रिय आणि चतुरस्त्र पण गंमत अशी की हे पद प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणीतून उतरल्याची माहिती बऱ्याच जणांना नसते. ह्या रोमँटिक पदा साठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अतिशय चपखल पणे मालकंस राग निवडला आहे.
याच तबकडीवर असलेलं दुसरं पदही तितकंच दिलखेचक! हे बंध रेशमाचे या नाटकातील अभिषेकी बुआंनी कर्नाटक संगीतात प्रचलित असलेल्या राग सरस्वती मध्ये संगीतबद्ध केलेली आणि शांताबाई शेळकेंच्या सिद्धहस्त झरणीतून झरलेली ही विरहीणीच म्हणा न!
विकल मन आज झुरत असहाय
नाही मज चैन,
क्षण क्षण झरती नैन
कोणा सांगू
ही चांद रात नीज नच त्यात
विरह सखी मी कुठवर साहू
नाही मज चैन,
क्षण क्षण झरती नैन
कोणा सांगू
विकल मन आज(गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा)
(गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा)
नितीन सप्रे
8851540881
nitinnsapre@gmail.com
अप्रतिम सर खुपच छान आठवणींना सुवर्णमय उजाळा शब्द बध्द केलात सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाअतिशय सुंदर. त्या आठवणी आता विरळाच.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाअप्रतीम लेखन, स्मृतिविभोर करणारे! धन्यवाद! 🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद अशोकजी...It looks that we are not only from same city but also on same plane,,,,☺️
हटवाKhupch chhan, sir
उत्तर द्याहटवाThank you dear...nice to see you picking marathi very fast...
हटवाVery nicely written!! 😊😊
उत्तर द्याहटवादोन्ही गाणी व बकुल पंडित ही एकच आहेत. अजरामर गाणी.
उत्तर द्याहटवानितीन
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन. तुझ्या या आवडी/निवडी मुळे छान ऐकायला मिळते.
खूप छान सुरेख लेख- मी पहिल्यांदा ऐकली दोन्ही गाणी.
उत्तर द्याहटवानितीन, तुझ्यामुळे गतस्मृतीना उजाळा मिळाला.. आणि कित्येक वर्षे मनामध्ये हरवलेली गीत रत्ने ओठाबाहेर आली.
उत्तर द्याहटवाआमच्या बालपणी देखील पहाटेच्या समयी आईची घरकाम सुरु असताना मुंबई ब वर मराठी भक्तिसंगीत लागायचे व मन प्रफुल्लित करायचे, त्याची आठवण झाली. मन आनंदी झाले. आपले बालपण खरोखरच रम्य होते.
उत्तर द्याहटवापुण्यात असल्याने बकुळ पंडित यांचे गाणे ऐकायला मिळाले. हे बंध रेशमाचे नाटकात नंतर एकदा त्या, वसंतराव देशपांडे व सतीश दुभाषी आमच्या घरी आले होते. पण ते उशीरा म्हणजे नाट्य प्रयोग संपल्यावर आले होते. त्यामुळे वडिलांनी मला उठवले नाही. बकुळ पंडित व सतीश दुभाषी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी हुकली. आजही वाईट वाटते.
उत्तर द्याहटवारेडिओत नोकरी असल्यामुळे खूप म्हणजे खूप गाणी ऐकली. रेडीओवर आणि आकाशवाणीच्या रेकॉर्ड संग्रहालयात. बकुल पंडीत यांचं उगवला चंद्र तर मला खुप आवडायचं ते त्यांच्या गायन शैलीमुळे.
उत्तर द्याहटवानितीनजी, छान लिहिलय तुम्ही त्यांची वेगळी ओळख झाली. समाधान वाटले.
विकल चंद्र.. अहाहा शीर्षक आणि लेख सुंदर! आठवणींच्या गंधकोषी घेऊन जाणारा लेख! अभिनंदन 💐
उत्तर द्याहटवा