स्मृतीबनातून-प्रश्न ?(पद्य)

यंदा काहीसा शितळ राहिलेला उन्हाळा गेले दोन दिवस आपल्या मुळपदी जातो आहे. उष्ण दुपारी मनात उमटलेले प्रश्न...


प्रश्न ?


(फोटो - नेहा सप्रे)

असे कसे कुणी हसायचे

साहतांना त्या वेदना

आवरायचे हुंदक्यांना अन् कसे

सर्वस्व अपुले गमवताना  


केले जीवाचे रान होते

घर सान सजविताना 

काय झाले ना कळे

भासतो आता एकलपणा


हीत ज्यांचे होते साधले

हात तेच झिडकारती

हे असेच घटले होते

वाल्यासंगे तेव्हा काही


जीवन सत्य असेच असते

गमते हे सर्वांना

का न चरण धरावे

हरीचे जीवन जगताना


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

नवी दिल्ली

(0906231650)

टिप्पण्या

  1. जीवन सत्य असेच असते
    छोटिच कविता मोठा आशय. छान आहे👌

    उत्तर द्याहटवा
  2. आशय पूर्ण कविता. ललित लेखनाप्रमाणे काव्य क्षेत्रातली तुमची मुसाफिर ही उत्तम आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक