स्मृतीबनातून – मायारूप (पद्य ११०)


​गुरुदेव टागोर यांना असे म्हणायचे आहे की, जरी त्यांचे अस्तित्व एका लहानशा 'मातीच्या पणती' सारखे असले, तरी जेव्हा त्यांच्यावर ईश्वराची असीम कृपा आणि आकाशासारखी विशाल करुणा बरसते, तेव्हा त्यांचे रिकामे जीवनही दैवी प्रकाशाने उजळून निघते. हे काव्य म्हणजे पूर्ण समर्पण आणि समाधानाचे गीत आहे.

आछे आमार हृदय आछे भरे

ओगो, तोमार दान ओइ आकाश-भरे।

आछे आमार हृदय आछे भरे।।

आमार एइ ये माटीर प्रदीपखानि

जेने निले तोमार आलोर बानी,

ओगो, तोमार नक्षत्र-प्रदीप-शिखाय

जागलो आमार शुन्य घरे।।


मायारूप


हृदय माझे तव प्रेमाने ओसंडले

कर देवा तुझ्याच मनीचे सारे

असता तू सदा अंतरी नेमाने

घे हरून खुशाल बाह्यांगी सुखे


करुनी नष्ट तहान प्राणाची येथे

पिपासेतून मी मुक्त व्हावे असे

मग मरूभूमीतही तू घेऊनी जावे

तप्त रणात मजसी खुशाल फिरवावे


मायेचा जो खेळ तुझा चाललासे 

सांगतो तुला मला आवडीचा वाटे

व्हावा अश्रूपात तो एक नेत्राने

दुजा ओसंडून वाहे अतीव मोदे 


सर्वस्व ते गमावून बसलो भासे

गवसते दिव्य त्यावेळी अधिक ते

लोटसी दूर तव अंकावरूनी कोठे

उचलून हृदयी घेणार मजसी खासे 


आछे आमार हृदय आछे भरे ११०

https://youtu.be/iFtrrZPD-RE?si=i1-c6jgy400Ryg6G


हृदय माझे तव प्रेमाने ओसंडले

गगन व्याप्त दयाळा तव आशिषाने 

हृदय माझे तव प्रेमाने ओसंडले


मातीच्या दीपका सम माझे हे जीवन

परी तव आलोक वाणी केली ग्रहण

तुझ्या या नक्षत्रासम दीप प्रकाशात

उजळून निघाले माझे हे रिक्त घर


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

300520251600




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती