पोस्ट्स

स्मृतीबनातून: कंठमती सूर मालिनी

इमेज
‘कंठी कौस्तुभ मणी विराजित’ कंठमती सूर मालिनी : कलाकार नव्हे कलोपासक आजच्या सारखं ग्लॅमरस शाळांचं पेव फुटलं नसतानाच्या काळात, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण मराठी शाळेत जाणारी मुलं साधारणतः प्राथमिक शाळेत असतानाच पाठ करायची आणि पुढे समाजात वावरत असताना त्या म्हणीचा अर्थ नीट समजायला लागायचा. नागपूर, मुंबई, पुणे अशा शहरांत बव्हंशी काळ घालवलेल्या माझ्या आयुष्यात, नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात क्वचित घडावा असा योगायोग प्रथमच घडून आला. या डिसेंबर महिन्यात(2024) वाराणसी, आग्रा, गोकुळ, वृंदावन आणि खरगोन (मध्यप्रदेश) प्रवासाच्या निमित्तानं, गंगा, यमुना आणि नर्मदा या तीनही पुण्यपावन नद्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या तीनही नद्यांच्या शांत, विस्तीर्ण पात्रांकडे बघताना मनातील उथळ खळखळाट निवून जाऊन एकप्रकारचा शांतभाव आपोआप उगम पावतो. सेवा निवृत्तीच्या महिन्यात जुळून आलेला हा योग विशेष होता. या पार्श्वभुमीवर नवीन वर्षाची आणि आयुष्याच्या नव्या आवृत्तीची सुरुवात झाली ती भाग्यनगर संस्कृती संमेलनाच्या निमित्तानं हैद्राबाद प्रवासानी.  आता हैद्राबाद हे नाव घेताच चटकन आठवतात ते सलारगं...

स्मृतीबनातून – नाते (पद्य)

इमेज
नाते उलटून मोठा काळ गेला, भेटला कोणी नाही कधी ना पुसली ख्याली खुशाली वा कुठला आरोप नाही  मौनात मी राहिलो जरा, प्रवाही झालो काळा सवे  नात्यात वाटली ओल होती, कोरडी होत गेली स्वये  का काढीशी तू खपल्या पुन्हा जुनाट कोरड्या जखमांवरीच्या परतून अचानक का उगाच, तू पुन्हा येऊ लागला आता न पहिल्या प्रमाणे, हृदयी प्रीत भावना तशी नव्याने आता चेहरा माझा सजणार तो नाही कधी मनात नाही सल आता, मिटले घट्ट ते दरवाजे थाप पडताच न धावते, आता नाते थकून गेले जे नाही विचारता आले, एकांती निवांत भेटीत सारे आता कसे पुसावे तुला, कुठल्या कारणाने गर्दीत यारे नितीन सप्रे 050920251830

स्मृतीबनातून–आ अब लौट चले...

इमेज
आ अब लौट चले... भेडाघाट...मध्यप्रदेशात जबलपूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं स्थळ. एकीकडे क्षीरसागराचं उर फुटल्यागत खाली दरीत सतत कोसळणाऱ्या शुभ्र धवल धबधब्याचा निनाद तर दुसरीकडे उंच संगमरवरी खडक रांगांतून पसरलेली सखोल, धीर गंभीर नर्मदा आणि नीरव गूढ शांतता. ‘दुदुची हैय्या’ असं म्हणण्याच्या वयापासून या नितांत सुंदर स्थळी मी जातो आहे. इथलं अन्य आकर्षण म्हणजे नौका विहार आणि त्यात जर नावाडी बोलका आणि रसिक असला, तर मग क्या कहने! इथे चित्रित झालेल्या बॉलिवूडच्या गाण्यांची रसभरीत वर्णनं करताना त्याची रसना थकत नाही. रसिकाग्रणी राज कपूरचं चित्रीकरणासाठीचं हे लाडकं ठिकाण. संथ ठाय लयीतल्या नौकानयना दरम्यान त्याच्या दोन गाण्यांच्या कथा मी नावाड्या कडून ऐकल्या आहेत. पौर्णिमेची रात्र...नर्गिसचा साजूक अवखळ अभिनय...त्याला राजच्या निरागस पण किंचित खोडकर अभिनयाचा प्रतिसाद...प्रेमात स्त्री पुरुषांचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो यावर गीतकार शैलेंद्रनी मुखड्यात नायक नायिकेच्या मुखी केवळ एक शब्द इधर चा उधर करून साधलेली गंमत...आणि शंकर जयकिसनच्या संगीतात मुकेश–लतानी आपल्या सुरेल मधुर सुरांनी आबाद केलेलं आवारात...

स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)

इमेज
सोनेरी किरणं आणि पाऊस सरींचा खो खो सुरू होता.  चहा पित  खिडकीतून तो  पाहत असताना  अज्ञात कवीची एक हिंदी कविता व्हॉटसअप  वर समोर आली... आणि अंतरात उमटली... भाळणे   रूप शृंगारावर, तुझ्या भाळलो  रंगीत रेशीम, भासांवर भाळलो तू जवळ नाही, तरीही आठवणींवर, तुझ्या भाळलो तूही मला स्मरले असशील त्या क्षणकाळावरी, भाळलो आपुलीच असावी ज्यात कहाणी  शब्ददलांवर त्या, मी भाळलो गंधाळल्या ज्या तुझ्या प्रीतीने मृदुल त्या, भावनांवर भाळलो  स्वप्न असावी भेट आपली, पण स्वप्नील त्या, स्वप्नावर भाळलो नितीन सप्रे 030820251645

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

इमेज
  सुधीर स्वरलालित्य योग आणि गुण  यशोशिखरावर आरूढ व्हायचं असेल तर काही योग जुळून यावे लागतात तसच काही गुण व्यक्तिमत्त्वात असावे लागतात. योग म्हणाल, तर अगदी अजाण वयात गुण हेरू शकतील अशी मंडळी आसपास असणं, हेरलेले गुण विकसित व्हावे या साठी त्यांच्या कडून कृती होणं, उत्तम गुरू लाभणं, नियती आणि त्याबरोबरच दैवी कृपा लाभणं अशी यादी देता येईल आणि गुण म्हणाल तर गुरूनिष्ठा, तन्मयता, मेहनतीची तयारी, मन–बुद्धीची तरलता, अशा बाबी सांगता येतील. कोल्हापुरात 25 जुलै, 1919 साली जन्मलेल्या रामचंद्राच्या बाबतीत हे योग तसंच गुण, छान जुळून आले. दारावर येणाऱ्या बैराग्यांनी गायलेली भजनं, कवनं, गाणी यांची सही सही नक्कल अडीच तीन वर्षांचा राम करीत असे. त्याचं घराणं हे निस्सिम राष्ट्रभक्त. वडील व्यवसायानं वकील. कोल्हापुरातील टिळक असा नावलौकिक कमावलेला. छोट्या रामाची गायन कलेतली रुची आणि गती त्यांनी वेळीच हेरली. (वडील) सुदैव असं की त्याच्या दोन्ही मामांनीही त्याला गायन शिकवण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली आणि अवघ्या सहाव्या वर्षी या रामलल्लाला त्याचे वडील गानवासासाठी वामनराव पाध्येबुवां कडे पाठवते झाले. क...

स्मृतीबनातून – तालवाद्यांचा तालेवार

इमेज
तालवाद्यांचा तालेवार  प्रस्ताविक ‘ लॉर्ड्स ऑफ रिदम’ आपल्या अंगीभूत आणि जोपासलेल्या तालवाद्यातील निपुणतेनं हिंदी चित्रपट सृष्टीवर 1947 ते 1987 अशी चार दशकं, पिता कावस आणि दोन मुलं बर्जोर आणि केरसी लॉर्डस  या परिवारानी अधिराज्य गाजवलं. या दरम्यान ध्वनिमुद्रित/चित्रित झालेल्या प्रत्येक तिसऱ्या गाण्यात या परिवारतल्या या तीन सदस्यांपैकी कुणी न कुणी वाद्य वाजवलं आहे अशी माहिती मिळते. कावस लॉर्ड तर पहिला बोलपट आलम आराच्या निर्मिती पासूनच या क्षेत्रात कार्यरत होते. इतकंच नाही तर ताल वाद्ये किंवा आघातानी ध्वनी निर्माण होणारी वाद्ये ही भारतीय चित्रपट संगीत सृष्टीला त्यांची देण आहे असं ही माहितगार सांगतात. तर केरसी या बर्जोरच्या भावानं डिजिटल म्युझिक इक्विपमेंटचा या संगीत विश्वाला परिचय करून दिला. स्वतः बर्जोर लॉर्ड्स यांना नानाविध तालवाद्य बजावण्यात सिद्धहस्तता प्राप्त झाली होती. ड्रमस व्यतिरिक्त ते काँगो बाँगो, घुंगरू, झायलोफोन, व्हायब्रोफोन, लाकडी ब्लॉक्स अशी कितीतरी वाद्ये अधिकारपूर्वक वाजवित. ऑक्टोपॅड तसंच इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड वाजवण्यातही ते पारंगत होते. आपल्या बॉलिवूड कार...

स्मृतीबनातून –वारी(पद्य)

इमेज
वारी पंढरीला जाईन आनंदें नाचीन  विठुरायाला भेटेन चरण धरीन घेऊन दर्शन होऊनिया लीन  देहबुद्धी म्लान  चंद्रभागेत धुऊन अहंभाव सांडून कीर्तनी रंगीन  घडव सुजाण  प्रसाद मागीन  देई आशीर्वचन  कृपाळू भगवान विठाई समचरण  आनंद निधान  नितीन सप्रे   060720250640 आषाढी एकादशी