पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैचारिक - हे जन हाती धरी दयाळा

इमेज
  हे जन हाती धरी दयाळा मातृभाषेचा अभिमान हा असायलाच हवा.  बहुतेक सर्वच जण तो बाळगतातही. पण भाषेचा अभिमान बाळगायचा म्हणजे नक्की काय करायचं? या बाबतीत मात्र सर्वसाधारणतः मनात, आचारात, विचारात अनेकदा अस्पष्टता आढळते. भाषेचा अभिमान हा मुख्यत्वे त्या भाषेतील साहित्य, संस्कृती, इतिहास, शब्दसंपदा, विचार दर्शन या सर्व बाबींवर ठरत असतो. या अनुषंगानं विचार केला तर मराठी संत परंपरेतून मांडलं गेलेलं विश्र्वरुप विचार दर्शन हे निश्चितच विशेष अभिमान बाळगण्या योग्य आहे. ऋग्वेदातला एक प्रचलित श्लोक, "आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च", मानवी जीवनाचे दोन महत्वपूर्ण उद्देश्य अधोरेखित करतो. एक मोक्षप्राप्ती आणि दुसरं विश्व कल्याण. स्वतः ज्ञानप्राप्ती साधून, श्रीमद्भागवतगीतेचे तत्वज्ञान सर्व साधारण लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी, ती तत्कालीन प्रचलित मराठीत लिहिली. ज्ञान यज्ञानं तोष पावून प्रसाद द्यावा अशी मागणी त्यांनी विश्वात्मक देवा कडे केली. हा प्रसाद मागताना, त्यांनी स्वतः साठी तर नाहीच पण देश, काळ, संप्रदाय या तश्या विशाल, पण तरीही संकीर्ण अश्या सीमारेषा ओलांडून, विश्र्वकल्...

स्मृतीबनातून प्रासंगिक - साssथी रे…

इमेज
  साssथी रे… बॉलीवूड संगीत की कई रचनाएं, जो की रागदारी संगीत पर आधारित हैं हमारे दिलों मे सदा के लिये जगह बना चुकी   है । शब्द, सुर, ताल से बनी एक सुंदर माला जैसे ये गीत, यद्यपि किसी एक फिल्म के लिये बने जरूर, पर भविष्य मे वो स्वयंभू हो गये । जैसे विनाशी देह मे बसा अविनाशी आत्मा । फिल्म भले याद रहे या ना रहे, यह गीत सालों से सूने जा रहे है तथा अमरपद प्राप्त कर गए । ये गीत नये कलाकारों को भी अविष्कार करने का इशारा करते है । इन गीतों की  शृंखला मे सन 1977 मे प्रदर्शित 'कोतवाल साब'  फिल्म का अपर्णा सेन और शत्रुघ्न सिन्हा पर फिल्माया गीत निश्चित ही शामिल होगा । ऋषिकेश मुखर्जी द्वारा निर्देशित इस फिल्म के कुल तीन गीतों मे से दो आशा भोसले ने तथा एक अन्य गीत हेमलता ने गाया हैं । स्वयं संगीत निर्देशक रवींद्र जैन ने ही शब्दबद्ध किया, आशा भोसले का गाया 'साथी रे भूल न जा ना मेरा प्यार' यह गीत संगीत प्रेमीयों के दिल में आज भी तरोंताजा हैं । अपने ही शब्दों को संगीत मे ढालते समय, आशा का पुनम स्वर ही संगीत निर्देशक रविंद्र जैन के जहन मे नि:संदेह रहा होगा । साथी रे भूल ना जान...

स्मृतिबनातून -परमात्माईची अंगाई

इमेज
  परमात्माईची अंगाई 'नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे' लहानपणा पासून कित्येकदा कानावर पडलेलं हे अंगाई गीतं. उत्तम चाली रीती आणि समर्पक गायन सौष्ठव यामुळे संगीताची अगदी साधारणशी जाण असलेल्याही कुणाच्या हृदयाचा ठाव घेईल, असंच आहे. आज वयाच्या पंचम दशकात पुन्हा एकदा, अगदी अवचितपणे ते सामोरं आलं. यावेळी नुसतं कान देऊन नाही तर मन देऊन ही ते ऐकलं गेलं असावं आणि म्हणूनच पूर्वी कधीही न जाणवलेल्या  आशयाशी परिचय झाला.  लतादीदी आणि राहुल देशपांडे या दोन्ही स्वराधिश…नाही..नाही स्वराधिन किंवा स्वरालिन म्हणुया, कारण स्वराधीषत्वाचा दावा या पृथ्वीतलावरच काय त्रिखंडात देखील कुणी करणार नाही असं मला वाटतं. गुणीजनांच्या प्रतिभेवर भाळून, आपण रसिकजन जरी अश्या उपाध्या देत असलो तरी सच्चा गायक, कितीही मोठा कलाकार असला तरी स्वतःला मनोमन स्वराधिन, स्वरालिनच मानत असतो. या दोन्ही गायकांनी सादर केलेला हा गीताविष्कार एका पाठोपाठ एक पुनःपुन्हा ऐकला आणि एकेका शब्दातून, शब्दार्थाच्या पलीकडले निराळेच भावार्थ मनात उचंबळून  आले.  मराठीतल्या अनेक कविता, गीत  रचना, वरकरणी जो एक अर्थ रसिकां पर्यंत ...