पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - खंत(पद्य)

इमेज
  नमस्कार…. साहित्य, कला, संस्कृती या विषयांवर आधारित ' स्मृतीबनातून ' हा अनियतकालिक ब्लॉग मी जून 2019 (२५.६.२०१९) ला सुरू केला. तेव्हा पासून, आता पाच वर्षांहून अधिक काळ तो अनियमितपणे पण सातत्यानं आपणाला सादर करीत आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले असून साधारणतः ते सर्व, विभिन्न वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंक आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानं माझा उत्साह वाढला. तसच आपणापैकी बहुतेकांनी नियमित आणि काहींनी साक्षेपी अभिप्राय देऊन मला प्रोत्साहित केलं. त्याची उतराई मी कशी करणार? या काळात हा ब्लॉग वाचलेल्यांची, पाहिलेल्यांची म्हणुया हवंतर, संख्या सुमारे 46 हजारांवर पोहोचली आहे. यात भारता खेरीज 18 हून अधिक देशांतल्या सुमारे हजार वाचकांचा ही समावेश आहे. जो माझ्या सारख्या सामान्यजनासाठी प्रेरणादायी आहे.  आजवरची गद्यसेवा आपण रुजू करून घेतली आहे. तेव्हा आजच्या राम नवमीच्या मुहूर्तावर आपणासमोर या ब्लॉगच्या माध्यमातून पद्यसेवा मांडण्याचाही मानस आहे, अट्टाहास नाही. कारण सक्तीनं सृजन होत नाही. तेव्हा पद्यसेवा कितपत आणि कशी होईल माहीत नाही. गुणात्मक मूल्यांकन आपणच करणार...

सुरेशाचा गझलोत्सव - कलंदर 'भट'कंती

इमेज
  सुरेशाचा गझलोत्सव - कलंदर 'भट'कंती प्रास्ताविक ओळख! एक दिवस अचानक हा शब्द गुंजारव करत मनात आला आणि म्हणता म्हणता त्यानं मनात विचारांची वावटळ उठवली. अमुक एक व्यक्ती ओळखीची आहे असं म्हणतो तेव्हा आपण खरंच त्या व्यक्तीला ओळखत असतो का? काहीवेळा पाहिलेल्या व्यक्तीला, दोन चारदा भेटलेल्या व्यक्तीलाही, आपण ती व्यक्ती ओळखीची आहे असं म्हणणं बरोबर असतं का? ही सर्व प्रस्तावना ह्या साठी की प्रचलित बोलचाली प्रमाणे वैदर्भीय बाण्याचे लोकप्रिय कवी, गझलकार सुरेश भट यांना मी ओळखू लागलो साधारण आठवी, नववीत असताना पासून. त्यांचा मुलगा आणि मी काही काळ एकाच शाळेत होतो. आम्हा दोघांची स्वभाव, प्रकृती जरी एकदम भिन्न असली, तरी का कुणास ठाऊक, आमच्यात थोडी मैत्री जुळली. बहुदा ती त्याच्या मुक्त छंदी वागण्यामुळे. शालेय जीवनात एकमात्र वेळा झालेली शिक्षा ही त्याच्या बरोबर शाळे लगतच्या वनात, मधली सुटी संपून गेल्यावरही, चिंचा, बोरं तोडत भटकत राहिल्यामुळे झाली होती. अशा प्रकारात अर्थातच तो माझ्यापेक्षा भलताच सरस होता. त्यामुळे आमच्या मुख्याध्यापकांवर भट साहेबांना शाळेत बोलावण्याची वेळ वारंवार येत असे. त्यावेळी बर...

स्मृतीबनातून - छोटा नव्हे वाग्येयकार गंधर्व

इमेज
  छोटा नव्हे वाग्येयकार गंधर्व सकाळी दार उघडून घरातून बाहेर येताच आपल्या अंगणातल्या फुलझाडांची फुलं तोडणारी कुणी व्यक्ती दिसली तर साधारणतः ती हमखास शेलक्या विशेषणांची धनी होणार हे निश्चित. पण एखादा दिवस वेगळा उगवतो.1993 सालच्या हिवाळ्यातला तो दिवस माझ्यासाठी तरी असाधारण ठरला. त्या दिवशी सकाळी, मलाही बागेतली फुलं तोडणारी व्यक्ती दिसली. पण राग येण्या ऐवजी मनात अनुराग उत्पन्न झाला. ती सकाळ माझ्या साठी 'आजी म्या ब्रह्म पाहिले' अशीच होती. कारण फुलं तोडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात लोकप्रिय कृष्ण होती. त्यावेळी मी आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यरत होतो. नुकताच चतुर्भुज झालो होतो आणि काही दिवस पुण्यातल्या कमला नेहरू पार्क जवळ प्रभात रोडच्या गल्लीत असलेल्या दीक्षितांच्या बंगल्यात रहात होतो. एक दिवस सकाळी उठून, बाहेर अंगणात येतो तर कुणीतरी वयस्क व्यक्ती पाठमोरी परस दारी असलेल्या फुलझाडां वरची फुलं तोडताना दिसली. कोण, कोठून आलात वगैरे चौकशी करणार, तेवढ्यात ती व्यक्तीचं माझ्या दिशेनी आली आणि स्वतःच्या मोठेपणाचा लवलेशही मनात न बाळगता अगदी निरागस ऋजुतेनं आपली ओळख देऊ लागली. मी अ...

स्मृतीबनातून - तोच चंद्रमा -प्रीतनिर्माल्य

इमेज
तोच चंद्रमा-प्रीतनिर्माल्य भूतलावरची होलिका दहनाची दाहकता आणि अवघं नभांगण व्यापूनही उरलेली चंद्राची केशरी दुधाळ शीतलता एकाचवेळी अनुभवत असताना धुंद समीराच्या सोबतीनं आलेल्या आर्त, कातर स्वरांनी मनाचा ताबा घेतला... ….तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी…. सकृतदर्शनी हे काव्य म्हणजे, भूतकाळातल्या सप्तरंगी लाघव खुणांचा, वर्तमानात धांडोळा घेणाऱ्या सुधीर प्रियकराची कैफियत आहे. परिस्थिती भूतकाळात होती तशीच असतानाही, वर्तमानातल्या वस्तुस्थितीमुळे मनस्थिती मात्र फार वेगळी असल्यामुळे हा धांडोळा व्यर्थ आहे हे समजूनही धीरोदात्तता बाळगून असलेल्या, कुणा त्याची आहे.  कवयित्री शांताबाई शेळके यांना ह्या नितांत लोभस, अर्थगर्भित, आशयपूर्ण काव्याची प्रेरणा मिळाली ती शिला-भट्टारिका यांच्या एका श्लोका वरून. विदूषी शिला-भट्टारिका या 9 व्या शतकातल्या. प्रचुर लेखन केलेल्या संस्कृत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. बहुतेक प्रमुख संस्कृत काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या रचना आढळतात. मध्ययुगीन संस्कृत साहित्य समीक्षकांनी त्यांच्या काव्य कौशल्याची वाखाणणी केली आहे. त्यांचा तो मूळ श्लोक...