स्मृतीबनातून-पाऊस🌧️💦(पद्य)

नैऋत्य मौसमी पावसाचं दोन दिवसांपूर्वी रविवारी आगमन झालं. गेल्या 62 वर्षात प्रथमच तो मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी अवतरला आहे. पावसाचं आगमन धरतीची कळाच बदलून टाकतो…


पाऊस🌧️💦



धरेच्या भेटीस पाऊस आला

भूमी सुस्नात करुनी गेला

लता सुमनांनी शृंगार केला 

सृष्टीवरी सुरू मेघमल्हार झाला


वसुधेने हिरवा शालू ल्यायला

जलानी झऱ्यांच्या बुट्टी काढल्या

मेघांनी कृष्ण रंग ओढला

चिंब गारवा हवेत आला


कृषक राजा सज्ज जाहला

ओल्या मृदेत जीव पेरला

बीजास आता कोंब फुटला

जीव त्याचा सजीव झाला


तरुणाईला ही मोहर आला

मनी मधूर भावना दाटल्या

हृदयांनी प्रीत राग छेडला

वर्षा सुरात सूर मिसळला



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

नवी दिल्ली

(2706230745)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक