स्मृतिबनातुन -ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….
ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….
म्हणजेच खय्याम यांनी आपली अमीट छाप उमटवली. लहानपणा पासूनच खय्याम यांना शिक्षणात विशेष रुची नव्हती मात्र त्यांचा संगीता कडे ओढा होता. दिल्लीत काकांकडे पळून आलेल्या खय्याम यांना काकांनी शाळेत दाखल तर केलं मात्र चित्रपट सृष्टीचं त्याला असलेलं आकर्षण पाहता काकांनी त्याला संगीत शिकण्याची मुभा दिली.
पंडित अमरनाथ हे खय्याम यांचे गुरू. अभिनयाच्या संधीच्या शोधार्थ ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिस्ती यांचे कडे संगीत साधना सुरू केली. एके दिवशी चिस्ती यांनी संगीत दिलेल्या रचनेचा मुखडा खय्याम यांनी गायला तेव्हा चिस्तीं यांनी खुश होऊन त्यांना सहायक म्हणून स्वीकारलं. त्यांनी सहा महिने ते काम केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या(WW II )वेळी खय्याम काही काळ लष्करातही दाखल झाले होते.
खय्याम यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत सुमन कल्याणपूर, सुलक्षणा पंडित, येसुदास आदी गायकांकडून गीतं गाऊन घेतली. चित्रपट निर्मात्यांचा दबावही त्यांनी कधी फारसा सहन केला नाही. आशा भोसले मात्र त्यांच्या साठी विशेष गायिका होत्या. आशाजींनी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी (1953) पार्श्वगायन केले ते थेट 2012 पर्यंत त्यांनी खय्याम यांच्याकडे गायन केले. आशा भोसले आणि मुकेश यांनी गायलेली वो सुबह कभी तो आयेगी, चीन-ओ-अरब आणि आसमा पे है खुदा ही चित्रपट गीतं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. 'शोला और' शबनम या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनामुळे संगीत दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीत त्यांचे स्थान पक्क झालं. एखाद्या सुंदर सरोवरात मंद वाऱ्यामुळे उठणाऱ्या हलक्या लहरीं प्रमाणे रोमान्स आणि भावपूर्णतेनं ओत प्रोत संगीत हे खय्याम यांच्या संगीताचं बलस्थान होतं. कवितेला सहज गातं करण्याची अनोखी कला त्यांना लाभली होती.
राजेश खन्ना यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर.डी. बर्मन यांना राजेश खन्ना यांची प्रथम पसंती असे. मात्र मजनू चित्रपटाच्या वेळी खय्याम यांच्या बरोबर काम केल्यानंतर राजेश खन्ना यांनी थोडीसी बेवाफाई, दिल-ए-नादान आणि दर्द या यशस्वी आणि संगीता साठी नावाजलेल्या चित्रपटांसाठी खय्याम याना घेण्याबाबत दिग्दर्शक, निर्मात्यांना खय्याम यांचे नाव सुचवले होते. तलत मेहेमूद, आशाताई आणि किशोर कुमार यांना खय्याम यांची विशेष पसंती होती. अर्थात मोहम्मद रफी, लता दीदी आणि मुकेश यांनीही खय्याम यांच्या संगीत दिग्दर्शनात गीतं गायली आहेत. राजेश खन्ना व राखी ही खय्याम यांची आवडती जोडी होती.
त्यांनी दाग, मिर्झा गालिब, वली साहेब, अली सरदार जाफरी, साहिर लुधियानवी, मजरूह सुल्तानपुरी,निजा फाजली, नक्स लायलपुरी, अहमद वसी,जान निसार अख्तर अश्या समकालीन(contemprory) तसच पूर्वसुरी(legand) दिग्गज कवी/गीतकारां बरोबर काम केलं. गीतकारांच्या निवडी संदर्भात ते फार चोखंदळ होते. म्हणूनच त्यांच्या संगीत रचनांमध्ये गायक आणि संगीताच्या बरोबरीने कवितेला/गीताला स्थान मिळालेल दिसतं. ते कवी/गीतकाराला पूर्ण स्वातंत्र्य देत. आणि म्हणूनच त्यांच्या रचना अधिक काव्यात्मक, अर्थवाही, गेय आणि प्रासादिक वाटतात.
नितीन सप्रे
9869375422
खूप मस्त लिहिलंय. जुन्या गाण्यांचे मुखडे ओळी व्यवस्थित आठवताहेत. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाखय्याम यांच्या सांगीतिक जीवनाचा आलेख समर्पक शब्दात मांडला. खय्याम जी ग्रेट संगीतकार होतेच् ,मला खय्याम यांची भावणारी गोष्ट म्हणजे त्यानी तत्त्वाशी तड़जोड कधी केली नाही
उत्तर द्याहटवा