पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - मागणे(पद्य)

इमेज
जिवनयापन करत असताना माणसाच्या बऱ्याच आवश्यकता असतात. त्या परिभाषित होऊ शकतात आणि अत्यावश्यक त्या पूर्ण ही होऊ शकतात. इच्छांचं मात्र तसं नाही. एक पूर्ण होताच दुसरी जन्म घेते.  " हज़ारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले" आणि म्हणूनच ईश्वर आपल्या आवश्यकतांच्याच यादीत असण  श्रेयस्कर... मागणे होईल मंद आता ज्योत नेत्री दृष्टी पडावी तव शांत मूर्ती मागणे इतुकेच हे अखेरी  इतुकीच कृपा  कर गा मुरारी होईल क्षीण आता आवाज कानी  घेऊन टाळ नाचू तुझ्या कीर्तनी  मागणे इतुकेच हे अखेरी इतुकीच कृपा  कर गा मुरारी थकून गेली मलूल झाली वैखरी राहावे सुरू नाम परी अंतरी मागणे इतुकेच हे अखेरी इतुकीच  कृपा  कर गा मुरारी संथ होईल आता हा श्वास नाकी असो तव दर्शनाची ओढ बाकी मागणे इतुकेच आहे अखेरी इतुकीच  कृपा  कर गा मुरारी अचेतन होईल दुबळी कुडी कैवल्य माळ घाल गळा सत्वरी मागणे इतुकेच आहे अखेरी  इतुकीच कृपा  कर गा मुरारी नितीन सप्रे नवी दिल्ली 250423

स्मृतीबनातून-घर,बंदूक,बिरयानी' राजधानी दिल्लीत

इमेज
'घर, बंदूक, बिरयानी' राजधानी दिल्लीत… मराठी माणूस एकत्र येतं नाही, खेकड्या सारखा असतो, एकमेकांचे पाय ओढण्यातच धन्यता मानतो, असे बरेच प्रवाद प्रचलित आहेत. त्यात थोडंफार तथ्य असेलही. पण हे सर्व समज थोड्या प्रमाणात तरी गैरलागू ठरतील असे काही उपक्रम दिल्लीतला मराठी टक्का सातत्यानं योजित असतो. त्यात दिल्ली मराठी अधिकारी यांचा ग्रुप, दिल्ली मराठी प्रतिष्ठान, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, पुढचं पाऊल आणि अशा आणखी काही संस्था कार्यरत आहेत. आयोजनात नाही होता आलं तरी अश्या समारंभात मी आवर्जून उपस्थिती लावली आहे. नुकत्याच (शनिवार 22.4.23) झालेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काही उत्साही मराठी अधिकाऱ्यांनी, अधिकारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'घर, बंदूक आणि बिरयानी' या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित केला होता. विशेष यासाठी की चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारही थिएटर मध्ये उपस्थित होते. अलिकडच्या काही वर्षात मराठी चित्रसृष्टिनं कात टाकली आहे. वैविध्यपूर्ण कथावस्तू मार्मिकपणे हाताळल्या जात आहेत. मराठी चित्रपटांची कक्षा रुंदावल्याचं सुखद चित्र दिसतं आहे. मराठी लोक बऱ्याच संख्येन...

स्मृतीबनातून-सांगता(पद्य)

इमेज
  "मृत्यु" आणि "मोक्ष" यामध्ये काय फरक आहे? माऊली म्हणतात..... "श्वास पूर्ण झाले आहेत आणि "इच्छा"  बाकी राहील्या आहेत, त्याला "मृत्यू" म्हणतात.... "श्वास" बाकी आहेत आणि सर्व "इच्छा" पूर्ण झाल्या आहेत, त्याला "मोक्ष" म्हणतात." सांगता नुरावी एक ही इच्छा, संपण्यापूर्वी श्वास सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास कर्तव्ये पूर्ण व्हावीत, मागणे हे तयास सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास व्हायचे होऊनी गेले, दुखवू नये कुणास सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास दृष्ट लागो न अंती, त्याने दिल्या जीवनास सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास भेटीचा राघवाच्या, नेहमी असावा ध्यास सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास सत्वर धावुनी यावा, घालता साद त्यास सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास कृपादृष्टी असू द्यावी, निर्वाणी रक्षावेस सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास नितीन सप्रे नवी दिल्ली 190423

स्मृतीबनातून-पहाट(पद्य)

इमेज
आज पहाटेच जाग आली. चहा करून घेतला. सूर्योदयाची वेळ झाली होती. सहज बाहेर लक्ष गेलं तर गाभुळलेली पहाट नजरेत भरली. कसे कुणास ठाऊक पण शब्द रांगत आले आणि मी ते हातातल्या मोबाईलवर फक्त उतरवले... पहाट पसरला लालिमा, प्राचीच्या गालावरती बिंब अहेव उठले तिच्या भाळावरती प्रसवली निशा, प्रकाश क्षितिजावरती जाहली सोनेरी लखलख भूमिवरती छायेचे नर्तन रेखले धरणी वरती  दव थेंब चमकती पानापानांवरती चालले कूजन राव्यांचे हे सुरांवरती सजीव मैफिल सजली अवनी वरती नितीन सप्रे नवी दिल्ली 180423

स्मृतीबनातून-सुहृद(पद्य)

इमेज
मी विखुरलेले शब्द चालीत बांधण्याचे कुणा सहृदयी संगीतकाराने मनापासून मनावर घेतल्याचे जाणवले. मार्गदर्शनही केले. विचार छंदबद्ध काव्यात शब्दांकित करणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत? कसा वाटला जरूर कळवा. सुहृद कधी वाटते हात डोई फिरावा सखा असा नित्य जवळी असावा कधी हात हातात माझा धरावा  कधी तो हळुवार गाली फिरावा कधी दाटले वाहिले नीर डोळा सेविन सुखे मानुनी गंगा जळा  कधी वाटते कधी भेटीस यावा मधु शब्द हृदयी पेरून जावा कधी मुक्त संचार त्याचा असावा  रंध्रात पिवळा बहवा फुलावा  कधी मानसी तो असा आठवावा स्वतःचा ही तेव्हा विसर पडावा कधी सूर माझा झालाच हळवा खोचून पीस कान्हा होऊन यावा नितीन सप्रे नवी दिल्ली 170423

स्मृतीबनातून-अपूर्तता(पद्य)

इमेज
नमस्कार! पद्य लेखन हा तसा माझा प्रांत नाही. कविवर्य सुरेश भट यांच्यावर लेख लिहिण्यासाठी संशोधन करत असताना त्यांच काव्य थोडं अधिक डोळसपजणे वाचलं गेलं. त्यातूनच आपणही काही खर्डावं ही उर्मी जागृत झाली. मग जे आणि जसं सुचत गेलं ते व्यक्त करू लागलो. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्यावर लिहिलेला माझा लेख पुन्हा वाचून काही फेरबदल करत असताना अचानक ज्या काही ओळी सुचल्या त्या त्यांना मनःपूर्वक अर्पण करून तुमच्या अभिप्रायार्थ सादर. अपूर्तता कल्पिलेले प्रेम ते अनुभवणे राहिले डोळ्यांतील नील स्वप्न साकारणे राहिले उधाण रूप भावनांचे  पाहणे राहिले उरी कुणा आवेगे जवळ घेणे राहिले सांगावे कितीक होते ते सांगणे राहिले मनातील काव्य सारे ऐकविणे राहिले नियतीच्या कवेत हे विसावणे राहिले अद्याप पुरतेच उध्वस्त होणे राहिले कंठी सूर होते रियाज करणे राहिले उन्मुक्त ते आर्त गीत आळवणे राहिले दुखावले गेले त्यांना सुखवणे राहिले प्राणिजात अजून कवटाळणे राहिले घेतला होता वसा तो निभावणे राहिले द्यावयाचे सावळ्याचे सारे देणे राहिले जे मिळाले त्याला, नमन करणे राहिले निघताना तयाचा, आशिष घेणे राहिले वचने ती दिलेली पूर्ण करणे राहि...

स्मृतीबनातून-प्रतिभा(पद्य)

इमेज
  प्रतिभा तू गुलाब प्रेमला, सुरंग तो जीवनी  तू पुष्प मृदुला, मधुगंध ती मोहिनी तू शितल चंद्रिका, आकाशी ती चांदणी तू चपल तडीता, लखलख साऱ्या भुवनी तू शब्द सरिता, तू भावगीत रागिणी तू स्वर पौर्णिमा, स्वर राग आलापिनी तू काव्य प्रेरणा, तू वाग विलासिनी तू दिव्य प्रतिभा, तू गजगामिनी नितीन सप्रे नवी दिल्ली 130423

स्मृतीबनातून-एकटा(पद्य)

इमेज
  एकटा समजेल कुणी हृद, हे मना समजावले कुणी ना समजे इथे, हेच समजून आले भोवती सतत असतो राबता माणसांचा क्षणोक्षणी हा भोवतो शाप एकटेपणा तरल भावनांना कधी शब्दच ना लाभले अंतरीच्या व्यथांचे अर्थ कुणा ना लागले साहतो मुकाट ते न्यारे गुलाबी घाव सारे चुकवून डोळा कधी नेत्रांतुनी नीर वाहे लाख जे यत्न केले, सगळेच नाकाम झाले लपविता आलेच नाही झालेले नेत्र ओले नितीन सप्रे नवी दिल्ली 110423

स्मृतीबनातून-कर्ता पुरुष(पद्य)

इमेज
  सुप्रभात!  तसा मी फेसबुक वर सापडतो पण फार क्वचितच तिथे वावरतो. आज आकस्मिकपणें कुणी अंजना अग्रवाल यांनी पोस्ट केलेली एक हिंदी कविता तिथे दृष्टीस पडली. वाचली. ती भावली. तोच धागा पकडून मलाही काही सुचलं. तुमच्या अवलोकनार्थ आणि अभिप्रायार्थही… (अंजना अग्रवाल यांची FB Post) "पुरुष कठोर होता नहीं बना दिया जाता हैं अमुमन उसे प्रेम ही नही मिलता मिलता हैं बस दायित्व पुरुष को पुरा प्रेम करनेवाली स्त्री जानती हैं कि  वह प्यार सरलता कोमलता  का कोष होता है ऐसी स्त्री के आगोश मे वह पिघलता हैं रो तक देता है" कर्ता पुरुष दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं पुरुष असतो का कुठे कठोर? तो तर असतो हळवा चकोर जीव नेहमी कासावीस होणार तरी पावसा साठीच थांबणार  दिसतो जरी सदा अधीर असतो परी तसा सुधीर जितका उथळ वाटणार तितका सखोल असणार कुटुंबा साठी कमवणार रिक्त भावानं तो जगणार भोवतीच्या रंगी रंगणार अलिप्त वृत्तीनं वावरणार टीकाच पदरी पडणार क्वचित प्रशंसापात्र होणार संकटात सदैव आघाडीवर सुखक्षणांत मात्र पिछाडीवर सगळ्यांचं सगळंच ऐकणार योग्य असेल ते सर्व करणार भावना मनापासून जपणार सहृदयालाच प्रचिती येणा...

स्मृतीबनातून - कुरुभूमी(पद्य)

इमेज
  कुरुभूमी सरत आले आयुष्य तरीही, अद्याप भेटला नाही सखा मी कोण? कुणाचा काय?, अजूनही उमगले नाही मला  चालता भेटले वाटेत जे, मानीले मी त्यांना सोबती  साधून स्वार्थ होता साथ त्याच क्षणी ते सोडती सहृदयी सख्याचा शोध घेणे, बेकार आहे मी जाणले लोकहो भेटले वाटेत जे, ते वाट आपुली चालले उगा मी जीवाचे रान केले, मांडल्या त्यांच्या व्यथा शोष मज जसा लागला, म्हणाले भांडतो का वृथा? नसतो कुणी कुणाचा या जगी, मर्म हे मी जाणले इतिहास साक्षी, कुरुभूमीवर आपुल्यानीच आपुल्यांचे रक्त सांडले नितीन सप्रे, दिल्ली 300323

स्मृतीबनातून - सुगंध मातीचा

इमेज
  सुगंध मातीचा दारी पडणाऱ्या पावसाचे थेंब अंगणात नाचू लागले, मातीचा सुगंध दरवळला, दग्ध झलेलेले सर्व भाव पुन्हा फुलून आले, धुक्यातून कुणाचं भावगीत सुरू झालं, सांजवेळी पैल राहिलेलं गावं आठवलं किंवा पंढरपूर गर्जू लागलं, जीवाला चकोरा सम कैवल्याच्या चांदण्याची ओढ लागली आणि नाचणाऱ्या वैष्णवांच्या डोळी नीर वाहू लागलं की जे जे काही आठवू लागतं त्यात अशोक गणेश परांजपे यांची आठवण ही अपरिहार्य आहे. प्रसिद्धीला सिद्धी न मानणारे अशोकजी साठच्या दशकापर्यंत जन्मलेल्या मराठी रसिकाला अपरिचित नाही. वडिलांच्या नावातलं इंग्रजी 'G' (जी) हे अद्याक्षर या कवीच्या नावाला अंत्याक्षर रुपात जोडलं गेलं आणि ते अशोकजी परांजपे असं रूढ झालं.  सुमन कल्याणपूर, अशोक पत्की, जितेंद्र अभिषेकी, प्रभा अत्रे, कमलाकर भागवत या सारख्या गुणीजनांच्या संगतीनं, मनाला भुरळ पाडणारी, सरल हळुवार भावगीतं किंवा भक्तीरसात चिंब भिजलेल्या अशोकजींच्या कवितांनी, गीतांनी नादावला न गेलेला खरा चोखंदळ मराठी रसिक सापडणं अशक्य आहे.  सांगली जिल्ह्यातलं हरिपूर हे नाटककार गोविंद बल्लाळ देवल (संगीत शारदा, मृच्छकटिक, संशय कल्लोळ) यांचं गाव ह...